जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान   

पाऊस थांबल्यानंतर होणार पंचनामे

पुणे : मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. विशेषत: दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यात विक्रमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पावसाने उघडीप दिली नसल्याने अद्यापि कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. दरम्यान, पाऊस कमी झाल्यावर कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी पंचनामे करावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आल्या आहेत. मंगळवारी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती. अनेक शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचून राहिले असून, पडत असलेल्या पावासामुळे पाण्याचा निचरा झालेला नाही. त्यामुळे पंचनामे करण्यास अडथळे येत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर तात्काळ पंचनामे केले जातील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 
तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : मावळ-६३, मुळशी-५४.६, शिरूर- ४७.७, इंदापूर-४४.९, खेड-४२.१, पुणे शहर- ३९, दौंड-३५, हवेली-३४.४, जुन्नर-२४.२, बारामती-२१.६, आंबेगाव-१८.७, पुरंदर-१८.६, भोर-८.२, वेल्हे-७.१ अशी पावसाची नोंद मागील २४ तासांत झाली आहे.तर मावळ तालुक्यात सर्वाधिक ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, संपूर्ण जिल्ह्याची पावसाची सरासरी ३५.१ मिली मीटर एवढी आहे.

Related Articles